हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई व मुलाचे मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले आहेत. ज्योती सागर सावळे असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव असून राजवीर सागर सावळे असं 5 वर्षीय मुलाचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात आई आणि मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
विवाहित असलेल्या ज्योती सावळे काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलासह खरवड येथे माहेरी आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी त्या मुलासोबत घराबाहेर पडल्या होत्या, पण परत आल्या नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर 6 नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात दोन मृतदेह दिसले. त्यांनी तात्काळ कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून तपासणीत ते ज्योती आणि राजवीर असल्याचे निष्पन्न झालं आहे.
हिंगोली :- साडेचार हजाराच्या बनावट नोटा सापडल्या ,विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघे ताब्यात
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आई व मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ असून घटनेनं हळहळ व्यक्त केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.













